जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली. ...
जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत. ...
नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. ...
प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. ...
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेला सापळा लक्षात आल्याने पंचाने कॉलरला लावलेला व्हॉईस रेकॉर्डर घेऊन धूम ठोकलेला श्रीकृष्ण राऊत हा पोलीस कॉन्टेबल अखेर बुधवारी रात्री जेरबंद झाला. ...