हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर् ...
खरीप हंगामाला प्रारंभ होण्यासाठी आता २0 दिवसांचा काळ उरला आहे. तरीही बँका पीककर्जाचे शेतकऱ्यांचे अर्जच स्वीकारत नसून अग्रणी बँकही नुसतीच बुजगावण्याची भूमिका निभावत असल्याने शेतकरी कर्जमाफी झाल्याने तरी कर्ज मिळेल, या भ्रमातच आहे. उद्दिष्टाच्या एक टक् ...
तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली ये ...
राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला. ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे. ...