देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद लक्षात घेऊन हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात फटका बसू नये म्हणून दिल्लीतूनच प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमण्यात आल्याचे समजते. ...
आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. ...
Wayanad Lok Sabha By Election 2024: लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी निवडणूक लढणं टाळलं. अखेर प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीत उतरवलं आहे. ...
Rajiv Kumar on Rashmi Shukla: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्याबद्दल आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. ...