देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. ...
मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे स्थानक येथील स्वामी नारायण मंदिरासमोर निदर्शने सुरू आहेत. ...
जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...
सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल. ...