देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे. ...
स्वाभिमानीचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे. ...
अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर् ...
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्या ...