देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
३ आॅक्टोबर रोजी रात्री आलोक वर्मा यांच्या दालनातून रात्री अडीच वाजता राफेल लढाऊ विमान घोटाळ्याचे दस्तऐवज गायब केले, कारण २४ आॅक्टोबर रोजी वर्मा या प्रकरणी एफआयआर दाखल करणार होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर ...
लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हाल ...
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्याप्रकारवे मोर्चेबांधणी शहरात सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. ...