देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे. ...
चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास ...
दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय ...