देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भारतीय संस्कृतीत एखाद्याला मदत केली तर आपण त्याचा गाजावाजा करत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने लाभार्थींना असे कृत्य करण्यास भाग पाडले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा कुठलाही विचार नाही. राज आणि मी भेटतो, याचा अर्थ आम्ही पक्ष म्हणून एकत्र येणार असा होत नाही. ...