देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याचे कृषी धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. ...
एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत. बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता. ...