देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Akola Municipal Election: अकोला महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष मतांचे गणित जुळवताना दिसत आहे. काँग्रेस वंचितला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे, पण काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने केलेल्या कामगिरीने काँग्रेसची डोकेदुखी ...
विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले ...