देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सिंह यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रासोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रा. स्व. संघाचा तळागाळातील एक स्वयंसेवक व जनसंघ–भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायांशी जमिनीवर बसत होता. त्यानंतर भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. हीच संघट ...
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये शनिवारी बैठक झाली. हा कायदा गरिबांना चिरडण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर आणि संसदेत लढा देऊ, असा इशारा खरगे यांनी केंद्र सरकारला दिला. ...