शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे

पुणे : पुणे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे. ही घटना इतकी अचूक आहे की पुढची हजारो वर्ष बदलावी लागणार नाही. असे मत व्यक्त केले आहे. 

पाटील म्हणाले, ही घटना समतेच्या बंधुत्वाच्या आधारावर आहे तर अनेक अर्थाने समानतेच्या आधारावर आहे. 1951 सालापासून झालेल्या सावत्रिक निवडणूक गरीब श्रीमंत यांना कुठल्याही जातीचा शिक्षणाचं बंधन नाही. कोणीही उभा राहू शकतो. जसा माझ्यासारखा गिरणी कामगारांचा मुलगा किंवा माझे आई-वडील सरपंच ही नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मध्य मंत्रिमंडळामध्ये २०१४ पासून सलग आहे.  

आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, मोदीजींनी गरिबांना शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिले. जातीवर अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे. त्या धर्तीवर हे आरक्षण दिले गेले होते. घटनेमध्ये दिलेलं संविधानात्मक आरक्षण ओबीसीचे आरक्षण त्याच्या अंतर्गत मराठा आरक्षण कायद्याने दिलेले कलम १५ आणि १६ आहे. त्याच्या राज्याने आवश्यकतेनुसार द्यावं. मराठा समाजाला दिलेला आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचं ऑटोकॉट प्रयत्न सुरू आहेत. गेले दीड वर्ष झालं ते रिझर्वेशन दिलं नाही. सरकारने ज्या प्रकारे हे आरक्षण दिलं आहे ते जाणार नाही. 

देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद राऊतांच्या मनात 

संजय राऊत जे बोलतील ते खरं न मानता ते खोट आहे असंच म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 167 जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला 235 जागा मिळाल्या. आणि या आमदारांनी देवेंद्रजी ना मुख्यमंत्री बनवले. या देवेंद्रजींनी 2014 ते 2019  आरक्षणाची सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा, हॉस्टेल, आरक्षण नसतानाही भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित मराठा ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसीचा मंत्रालय देवेंद्रजींनी वेगळा सुरू केले. देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे. त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं

मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण दिलं नाही. हे मराठा समाजाला पहिला आरक्षण देवेंद्र फडणीस यांनी दिले. त्यामुळे त्यांना ब्राह्मण हा शब्द लागू शकत नाही. एका रक्ताचे चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अजित दादांची वेगळी एकनाथ शिंदे यांची वेगळी. देवेंद्रजींची वेगळी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक एकत्र काम करतात. खळखळ झाली म्हणजे ते जिवंत आहेत.  

अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरच होणार 

अमित शाह रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले. समाधीचा जन्मोतदार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होणार होती. याचं स्वागत करायचं सोडून. संजय राऊत बोलत आहेत राजकीय दुश्मनी असावी. अमित शहा यांनी स्वतः पाचशे पानांचा शिवाजी महाराजांवर केलेलं पुस्तक पुण्यात की दिल्ली मध्ये प्रकाशित होणार हे राहिलं आहे. हे पुस्तक वाचल्या नंतर राऊतांना चक्कर येईल. इंदुमिल वरील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची किती ठेवायची याबाबत काही संघटना आम्हाला भेटला यावर चर्चा सुरू आहे. लवकरच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्याची ही प्रक्रिया लवकर सुरू होईल.

टॅग्स :Puneपुणेchandrahar patilचंद्रहार पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र