शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 5:20 PM

आडत्यांशिवाय बाजार सुरु राहणार बाजार समिती प्रशासनाची भूूमिका 

ठळक मुद्देश्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत निर्णय

पुणे: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मार्केट यार्डातील आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. यामुळेच शुक्रवार (दि.27)  रोजी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी भाजीपाला, फळे आणि कांदा व बटाटा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय दि.पूना मर्चट चेंबरने देखील 31 मार्च पर्यंत भूसार व गूळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार चेंबरने शुक्रवार (दि.27) पासून बाजार सुरू केला आहे. . या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजारा मध्ये होणाऱ्यां गर्दीमुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मार्केट यार्डातील बाजार सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आडत्यांनी केली. यामध्ये लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट याडार्तील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. तसेच कामगार देखील आपल्या गावाला गेल्याने कामगारांचाही प्रश्न आहे.परंतु कामगार संघटनांनी रविवार पासून कामगार कामावर हजर होणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डbusinessव्यवसायvegetableभाज्याfruitsफळेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस