शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 20:27 IST

Shivsena Vardhapan Din: गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. जर सत्तेसाठी कोणी कासावीस झाले असतील तर शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जाणार नाहीजे राजकारण करायचं असेल ते शिवसेनेच्या टर्मवर राजकारण करू.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकांत एकटं लढण्याची भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य करत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला एकप्रकारे इशारा दिला आहे.

स्वबळाच्या बाबतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कुणाची पालखी वाहणार नाही, स्वबळ हे महाराष्ट्राच्या हितासाठी हवं असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे. शिवसेना स्वत:च्या अटी आणि शर्तीवर राजकारण करणार आहे. हा इशारा अप्रत्यक्षपणे भाजपालाही देण्यात आला आहे. शिवसेनाही स्वबळावर निवडणूक लढू शकते असं भाषणातून दिसून येत आहे. जे राजकारण करायचं असेल ते शिवसेनेच्या टर्मवर राजकारण करू. महाराष्ट्रात स्वबळावर कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येत नाही. भाजपालाही आणि काँग्रेसलाही ते शक्य नाही. जे वास्तव आहे ते स्विकारा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षांना दिला आहे असं लोकमतचे वरिष्ठ संपादक संदीप प्रधान यांनी सांगितले.

त्याचसोबत गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर जर सत्तेसाठी कोणी कासावीस झाले असतील तर शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जाणार नाही हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. भाजपा राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेनेने पुढे काय करायचं हे मी ठरवणार आहे. मी कुणाची पालखी वाहणार नाही हे वाक्य त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी आणि भाजपाला उद्देशून म्हटलं, कोणीही मला गृहित धरू नये हेच त्यांना सांगायचं आहे असंही संदीप प्रधान म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊन जास्त जागा पदरात पाडण्याचं काँग्रेसचं राजकारण असेल मात्र एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शिवसेना तडजोड करायला तयार आहे. पण जास्त मागणी झाल्यास शिवसेना कोणाची पालखी वाहणार नाही असं अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीबाबत जपतानाच आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राम मंदिरावर कुठेही भाष्य केलेले नाही. त्याचसोबत भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांबाबतही थेट टार्गेट करणं टाळलं आहे. राम मंदिराच्या जमीन खरेदीत जे आरोप होत आहेत. त्यावर काही बोलले नाही. कारण त्यावर बोलणं म्हणजे संघाची नाराजी ओढावून घेणे हे त्यांनी केले नाही. भविष्यात शिवसेनेला पर्याय हवा असेल तर राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळलं आहे. लसीकरण धोरणांवर काही बोलले नाही. आजच्या भाषणात हा समतोल राखून त्यांनी एक वेगळ्याप्रकारचे संकेत दिले असावेत असंही संदीप प्रधान यांनी सांगितले.  

पाहा व्हिडीओ 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरHinduहिंदू