शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 07:42 IST

Mumbai News: मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उसळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर अखेर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादत मंत्र्यांसोबत येणाऱ्या गर्दीला एक प्रकारे चाप लावला आहे.

- सुजित महामुलकर मुंबई - मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उसळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर अखेर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादत मंत्र्यांसोबत येणाऱ्या गर्दीला एक प्रकारे चाप लावला आहे. आता एका मंत्र्यासोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका व्यक्तीलाच मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश मिळणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व मंत्री आणि विभागांनाही देण्यात आल्या आहेत. 

मंत्र्यांची भेट घेणे, मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी कार्यकर्ते मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहतात. बैठकीनंतर मंत्र्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह प्रस्तावातील संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. याव्यतिरिक्त इतरांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहणे अभिप्रेत नाही. असे असले तरी मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचाऱ्यांची आणि अभ्यागतांची उपस्थिती असल्याने  कामकाजात अडथळा निर्माण होतो, असे मुख्य सचिवांनी  पत्रात नमूद केले आहे.

बैठक संपेपर्यंत स्वीय सहायकांना प्रवेश नाही- बैठकीला मंत्र्यासोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका व्यक्तीस प्रवेश द्यावा, कार्यालयातील इतर कोणतीही व्यक्ती किंवा अभ्यागतांना परवानगी असणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. - अन्य कोणाला बैठकीला उपस्थित राहायचे असल्यास मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्ष (मुख्यमंत्री) यांची पूर्वपरवानगी असलेली कागदपत्रे मुख्य सचिव कार्यालय आणि संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यास सादर करावीत.  - मंत्रिमंडळ बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह या ठिकाणी असल्यास केवळ आमदार-खासदारांना प्रतीक्षाकक्षात प्रवेश द्यावा, मंत्रिमंडळ बैठक सुरू व समाप्त होईपर्यंत आमदार व खासदार यांचे स्वीय सहायक यांस बैठकीच्या परिसरामध्ये प्रवेश प्रतिबंधित करावा. बैठकीपूर्वी आणि नंतर २ तास सह्याद्री येथील मंत्रिमंडळ सभागृह परिसरात किंवा मंत्रालय ७ व्या मजल्यावर कोणतीही बैठक आयोजित करण्यात येऊ नये, असे काही निर्बंध अग्रवाल यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Only One Person Allowed with Minister to Cabinet Meeting

Web Summary : Maharashtra restricts cabinet meeting access: only one person per minister allowed. The rule aims to reduce congestion and disruption. Exceptions require the Chief Minister's approval. Restrictions also apply to assistants during meetings at Sahyadri Guest House.
टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार