शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:52 IST

भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

ठळक मुद्देचीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नवी दिल्ली- चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघर्षादरम्यान चीननं भारताच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु भारतीय लष्करानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्य सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे. इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे. 5 मे रोजी पूर्वेकडील लडाखमधील परिस्थिती आणखी चिघळली होती, जेव्हा सुमारे 250 चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात हिंसक चकमक झाली होती.

दुसर्‍या दिवसापर्यंत तो संघर्ष सुरूच होता. नंतर दोन्ही बाजूच्या लोकल कमांडरची बैठक झाली आणि दोन्ही बाजूचे सैनिक माघारी फिरले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली होती. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे सुमारे 100 सैनिक जखमी झाले. 9 मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. नाकू ला पास येथे जवळपास 150 भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे किमान दहा सैनिक जखमी झाले.

गेल्या आठवड्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेचे अनेक वेळा उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही किंवा याची पुष्टीही झालेली नाही. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडरमध्ये किमान पाच बैठका झाल्या. या बैठकीत भारतीय कमांडरने गॅल्व्हान व्हॅलीमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने मोठ्या प्रमाणात तंबू उभारल्याबद्दल आक्षेप घेतला. पीएलए ज्या भागात तंबू उभारत आहे, तो भाग भारताच्या हद्दीतील आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत