शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

"लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती ही…."; उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 2:24 PM

Rashid Alvi And BJP : उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी एक विधान केलं आहे. व्यापाऱ्यांसाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे. योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे. तसेच भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. लुंगी घालणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेस नेते राशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी विशिष्ट समुदायाला भाजपा लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "उत्तर प्रदेशातील निम्मी हिंदू लोकसंख्या लुंगी घालते. त्यामुळे मौर्य यांच्या विधानाचा अर्थ लुंगी परिधान करणारे गुन्हेगार आहेत का?" असा सवाल अल्वी यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर अल्वी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपाची निवडणूक जिंकण्याची हुशारी जनतेला समजली असून त्यामुळे भाजपा घाबरल्याचंही अल्वी म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची केली सुटका"

प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला केशव प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले. "2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे."

"2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल"

"व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019 पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत" असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकून 2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश