शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 3:40 PM

महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

मुलं आणि लग्नाच्या मुद्द्याव आसामचे राजकारण चांगलेच तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या लग्नासंदर्भातील सल्ल्यावर, जर आपल्याला लग्न करायचे असेल, तर आपण परवानघी घेण्यासाठी येणार नाहीत, असे AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी धुबरी मतदार संघातील काँग्रेस उमेदवार रकीबुल हुसैन यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्याकडे केवळ एकच मूल जन्माला घालायची ताकत आहे, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

खरे तर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निवडणुकीनंतर यूसीसी लागू होण्याचे संकेत दिले होते. तसेच, जर त्यांना (अजमल) दुसऱ्यांदा लग्न करायचे असेल तर, निवडणुकीपूर्वी करून घ्यावे. कारण UCC लागू झाल्यानंतर, बहुविवाहावर बंदी येईल. यावर, AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी सरमा यांना प्रत्युत्तर देत, 'जर मला दुसरे लग्न करायचे असेल तर,मी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी जाणार नाही.' 

'एक मुल जन्माला घालू शकत नाही' -याचवेळी, अजमल यांनी काँग्रेस उमेदवार हुसैन यांनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'त्यांच्यात (रकीबुल हुसैन) ताकद नाही आणि केवळ एकाच मुलाला जन्म दिला आहे. मी 7 मुलांना जन्म दिला आहे आणि आता त्यातील काही तरुण आहेत.' तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवाराने अजमल यांना 'म्हातारा वाघ' म्हटले होते. यानंतर, 'मी अद्याप एवढा म्हातारा नाही. मी दुसऱ्यांदा लग्न करू शकतो,' असेही AIUDF प्रमुखांनी अजमल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Assamआसामlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाUniform Civil Codeसमान नागरी कायदाmarriageलग्न