‘गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्ह्या बाळा’, ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’, ‘नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई’ यांसह विविध श्रीकृष्ण गीतांनी शहर आणि परिसरातील मंदिरे दुमदुमून गेली होती. ...
गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. ...
ईव्हीएम विरोधी राष्टय जनआंदोलनाच्या वतीने महाराष्टत काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. ...
महानगरपालिका पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने भद्रकाली येथील दूधबाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून, एका दुकानदाराने कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाख ...
शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे. ...
शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. ...
पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे. ...
प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगे ...
ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम ब ...