: तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातल ...
राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेस शहरातील सर्व केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहता शहरातील केंद्रसंख्या वाढवण्यात येणार आहे. ...
वाहतूक नियमांची शिस्त लावल्यास रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला फायदा आहे. वाहतूक नियमांचे पालन म्हणजे अपघातमुक्ती, असा मंत्र देत महापौर संदीप जोशी यांनी लॉ कॉलेज चौकात स्वत: वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. ...
दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठा ...
२०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला. ...
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचे प्रमाण लहान वयातच दिसू लागले आहे. यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणे हिताचे आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पीयूष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले. ...
बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला. ...
रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. ...
बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ...