शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:44 IST

३५ दिवसांमध्ये सापडले राज्यात ६ हजार नवे क्षयरोगी, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे.

सोमनाथ खताळ बीड - देशाला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्यासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव समोर आले असून, देशातील दीड लाख, तर एकट्या महाराष्ट्रातील ११ हजार ९१ गावांना क्षयरोगाचा धोका आहे.

२४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६ हजार १११ नवे क्षयरोगी आढळले आहेत. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील ११ हजार ९१ गावे ‘हाय रिस्क’ म्हणून निवडली आहेत. 

भौगोलिक स्थिती : झाडे, प्रदूषण आणि जलाशयांची स्थिती.आरोग्य स्थिती : कुपोषण, लसीकरणाची व्याप्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग रुग्णांची संख्या.जीवनशैली : दारू आणि तंबाखूचे सेवन करणारे लोक, दाट लोकवस्ती आणि कामाच्या ठिकाणाचा डेटा.

दीड कोटी लोकांची होणार तपासणी

या मोहिमेअंतर्गत राज्यातील ११ हजार गावांमधील दीड कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २,६७७ शिबिरांच्या माध्यमातून ५ लाख ४९ हजार ४३५ लोकांची नोंदणी झाली आहे. संशयित १ लाख १४ हजार ६१२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता ६,१११ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यांची नोंद ‘निक्षय’ ॲपवर केली असून, उपचार सुरू झाले आहेत.

१०० दिवसांचा हा कार्यक्रम असून, ११ हजार गावे हायरिस्क आहेत. १४ वर्षांवरील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.  - डॉ. आर. बी. पवार,  उपसंचालक, क्षयरोग, पुणे

यवतमाळ ५३९, अमरावती ५०४, नाशिक ४८८, रायगड ४८८, नागपूर ४८२, पुणे ४७९, चंद्रपूर ४६७, सातारा ४४२, गडचिरोली ४३३, नांदेड ४०४, अहिल्यानगर ४०१, रत्नागिरी ३८८, जळगाव ३८३, बुलढाणा ३६४, वर्धा ३५३, बीड ३४४, छत्रपती संभाजीनगर ३३९, कोल्हापूर ३१०, सोलापूर २९१, अकोला २४९, जालना २४२, गोंदिया २३९, लातूर २३८, नंदुरबार २३८, पालघर २३१, भंडारा २२६, परभणी २१२, ठाणे २१२, वाशिम १९८, सिंधुदुर्ग १८९, धाराशिव १८५, सांगली १८४, हिंगोली १७८, धुळे १७१

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming TB Surge: Maharashtra Faces Crisis, High Alert in 11,000 Villages

Web Summary : Maharashtra faces a TB crisis, with 11,000 villages on high alert. A recent campaign revealed over 6,000 new cases in 35 days. Screening of 15 million people is underway, utilizing AI for risk assessment and treatment.
टॅग्स :Healthआरोग्य