शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

By यदू जोशी | Updated: April 26, 2025 06:39 IST

१ ते ३१ मे दरम्यान सर्व नियुक्त्या करण्याचा प्रयत्न असेल. राज्य पातळीवरील समित्या, महामंडळांवरील नियुक्ती या १ जून ते ३० जूनदरम्यान करण्यात येतील

यदु जोशीमुंबई - मे मध्ये राज्य सरकारच्या  तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती, तसेच एसईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या व महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजपजनांना देण्यात आल्याने कार्यकर्ते, नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

भाजपचे आमदार, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष निवडीसाठीचे निरीक्षक यांची तीन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली. विदर्भाची एक ऑनलाइन बैठक शुक्रवारी झाली. या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्यांचे सुतोवाच केले. विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईओ), तालुका स्तरावरील २७ समित्या आणि जिल्हा पातळीवरील ३२ समित्यांवरील सदस्य, अध्यक्षांची भाजपच्या कोट्यातील नावे ही पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीकडून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जातील. १ ते ३१ मे दरम्यान सर्व नियुक्त्या करण्याचा प्रयत्न असेल. राज्य पातळीवरील समित्या, महामंडळांवरील नियुक्ती या १ जून ते ३० जूनदरम्यान करण्यात येतील. सूत्रांनी सांगितले की, महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात तीनपैकी एकच पक्षाचा मोठा प्रभाव आहे तिथे त्या पक्षाला जवळपास ६५ ते ७० टक्के पदे दिली जातील. 

कोणत्या पक्षाला कोणती महामंडळे?महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येक दोन नेत्यांची मिळून समन्वय समिती आहे. पुढच्या महिन्यात या समितीच्या बैठका होतील. कोणत्या पक्षाला कोणती महामंडळे द्यायची यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितपणे निर्णय घेतील, असेही सूत्रांनी सांगितले. 

जिल्हाध्यक्षांची निवड ३ मेच्या आत होणार

राज्यातील भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या असलेल्या ७८ जिल्ह्यांच्या अध्यक्षांची निवड ३ मे पूर्वी करण्यात येईल. जिल्हाध्यक्षपदासाठी जे निरीक्षक नेमण्यात आले ते पक्षातील २१ प्रकारच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येकाकडून तीन नावे घेतील. त्यातून सर्वाधिक पसंती मिळेल त्याला जिल्हाध्यक्षपद दिले जाईल. दोन टर्म पक्षाचा सक्रिय सदस्य राहिलेली असेल अशाच व्यक्तीचा जिल्हाध्यक्षपदासाठी विचार केला जाईल.  जिल्ह्यातून  तीन नावे जिल्हाध्यक्षपदासाठी  पाठविली जातील त्या व्यक्ती शिस्तप्रिय असाव्यात ही मुख्य अट आहे.

टॅग्स :BJPभाजपाMahayutiमहायुती