शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमधील गारेगार थंड पाणी की नॉर्मल, उन्हाळ्यात आपल्या शरीराला खरंच कशाची गरज? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:47 IST

Cold Vs Normal Water : जे हेल्थ कॉन्शिअस लोक आहेत त्यांना प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये फ्रिजमधील बर्फासारखे थंड पाणी प्यावे की साधे नॉर्मल पाणी? खरं तर याचे उत्तर आपल्या शरीराची गरज आणि त्या वेळची परिस्थिती यावर अवलंबून असते.

Cold Vs Normal Water : उन्हाचा पारा वाढला की, शरीराला अधिक पाण्याची गरज भासते. कारण सतत वाहणाऱ्या घामातून शरीरातील पाणी तर कमी होतंच, सोबतच अनेक पोषक तत्वही बाहेर पडतात. ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि आरोग्यासंबंधी इतर समस्याही डोकं वर वाढतात. हेच कारण आहे की, डॉक्टर या दिवसांमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण उकाडा वाढला की, अनेकांना नॉर्मल पाणी पिणं शक्य होतं नाही. एक घोटही घशाखाली जात नाही किंवा प्यायलं तरी तहान भागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी पितात. मग जे हेल्थ कॉन्शिअस लोक आहेत त्यांना प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये फ्रिजमधील बर्फासारखे थंड पाणी प्यावे की साधे नॉर्मल पाणी? खरं तर याचे उत्तर आपल्या शरीराची गरज आणि त्या वेळची परिस्थिती यावर अवलंबून असते.

थंड पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे

कडक उन्हातून घरी आल्यानंतर किंवा खूप घाम आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यावर लगेच आराम आणि गारवा जाणवतो. शरीराचं वाढलेलं तापमान पटकन कमी होत. ताजंतवानं आणि फ्रेश वाटतं आणि उष्णतेमुळे आलेला थकवा कमी होण्यास मदत होते. पण वैज्ञानिकांच्या मते, अतिशय थंड पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. याचा परिणाम पचन प्रक्रियेवर होऊ शकतो. तसेच अचानक खूप थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दी-खोकला, पोटात गोळे येणे, अ‍ॅसिडिटी, अपचन अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

नॉर्मल पाणी का चांगले मानले जाते?

खोलीच्या तापमानाचे पाणी शरीरासाठी अधिक नैसर्गिक आणि सुरक्षित मानले जाते. कारण नॉर्मल पाणी शरीराच्या नैसर्गिक तापमानाच्या जवळ असल्यामुळे शरीर ते सहज शोषून घेते. त्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही. जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच नॉर्मल पाणी पिणं अधिक योग्य मानलं जातं. कारण खूप थंड पाणी पचन प्रक्रिया मंदावू शकतं.

डॉक्टर काय सांगतात?

दिल्लीतील PSRI Hospital येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट Dr. Nripen Saikia यांच्या माहितीनुसार, दोन्ही प्रकारच्या पाण्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. थंड पाणी लगेच आराम देते, पण दीर्घकाळासाठी आणि पचन चांगले ठेवण्यासाठी नॉर्मल पाणी अधिक संतुलित आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.

मग कोणते पाणी प्यावे?

उन्हातून आल्यावर किंवा जास्त घाम आल्यानंतर थंड पाणी थोड्या प्रमाणात चालू शकतं.  मात्र रोजच्या वापरासाठी आणि खासकरून जेवताना नॉर्मल पाणी अधिक चांगलं असतं. म्हणून पुढच्या वेळी पाणी पिताना आपल्या शरीराची गरज आणि आरोग्य लक्षात घेऊनच योग्य पर्याय निवडा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य