शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:24 IST

West Bengal Violence : डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून ४०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण तणावपूर्ण झालं आहे. भाजपाचा मोठा विजय आणि तृणमूल काँग्रेस १५ वर्षांनंतर सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राज्याच्या अनेक भागांतून हिंसाचार, तोडफोड आणि संघर्षाच्या बातम्या समोर आल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. राज्याच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून ४०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सिद्ध नाथ गुप्ता यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी माहिती दिली की, आतापर्यंत २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले असून ४३३ लोकांना विविध प्रकरणांत अटक करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये ११०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर आज सकाळपासून कोणतीही नवीन अनुचित घटना घडलेली नाही आणि परिस्थिती आता शांत आहे.

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू

मुख्य निवडणूक आयुक्तांचे कारवाईचे निर्देश

निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू आणि अनेक पक्षांच्या कार्यालयांची तोडफोड झाल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानेही कठोर भूमिका घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्य अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, हिंसाचार आणि तोडफोडीत सामील असलेल्या आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने आयोगाने हे निर्देश दिले आहेत.

Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

पश्चिम बंगालच्या विविध भागांत हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. मंगळवारी संध्याकाळी न्यू टाऊन भागात विजय मिरवणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांनी  केलेल्या मारहाणीत भाजप कार्यकर्ता मधू मंडल यांचा मृत्यू झाला. बिरभूममधील नानूर येथे भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. यासोबतच कोलकाता येथील टॉलीगंज आणि कसबा व्यतिरिक्त बारुईपूर, कमरहाटी, बरानगर या उपनगरांमध्ये तसेच हावडा आणि बहरामपूर येथील टीएमसी कार्यालयांमध्ये आगजनी आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal Post-Election Violence: Hundreds Arrested After Clashes and Vandalism

Web Summary : Following West Bengal's election results, violence erupted. Police have arrested hundreds and filed over 200 FIRs after clashes and vandalism. The Election Commission has directed strict action against perpetrators. Areas like New Town, Birbhum, and Kolkata witnessed unrest.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसElectionनिवडणूक 2026Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा