शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:38 IST

सिंधू जल करारावरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे.

गेल्या काही काळापासून अंतर्गत संकटात सापडलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला उद्देशून 'युद्ध' आणि 'धमकी'ची भाषा सुरू केली आहे. सिंधू जल करारांतर्गत पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, ती युद्धाची कृती मानली जाईल, असे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले इशाक डार?

परराष्ट्र मंत्रालयात राजदूत आणि राजनैतिक समुदायाला संबोधित करताना इशाक डार यांनी भारतावर 'विनाकारण आक्रमकता' दाखवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "भारताने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला युद्धाची कृती मानून पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी आणि संकल्पाने उत्तर देईल." भारताने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही," मात्र पाकिस्तान अजूनही जुन्याच धोरणांचा अवलंब करताना दिसत आहे.

खोट्या विजयाचा सोहळा!

गेल्या वर्षी भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि इशाक डार यांनी या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले. आपल्या जनतेसमोर अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानी नेते आता भारताच्या विरोधात विष ओकून राष्ट्रवादाची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

क्षेत्रीय शांतता धोक्यात असल्याचा आरोप

डार यांनी असाही दावा केला की, गेल्या वर्षीच्या घटनांमुळे हे क्षेत्र विनाशाच्या उंबरठ्यावर आले होते. भारताची कृती ही एक नियोजित रणनीती असून पाकिस्तानवर बिनबुडाचे आरोप करून प्रक्षोभक विधाने केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. क्षेत्रीय शांतता ही द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणात ओलीस ठेवली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारताने सातत्याने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला घेरले आहे. 'पाणी अडवण्या'च्या धमकीला भारत नेहमीच चोख प्रत्युत्तर देत आला असून, आता पाकिस्तानच्या या नव्या धमकीला नवी दिल्ली कशा प्रकारे उत्तर देते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Threatens War Over Water; Revives 'Operation Sindoor' Claims

Web Summary : Pakistan's foreign minister warned India against blocking its water share from the Indus River, calling it an act of war. He accused India of aggression and falsely celebrated 'Operation Sindoor's' anniversary, alleging India jeopardizes regional peace with baseless accusations. India consistently counters Pakistan on terrorism.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर