शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 8:50 PM

हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर दिला फेकून 

ठळक मुद्देविक्रम उर्फ ताबडे खाडिया (२0) , सतीश खाडिया (१९), विपिन खाडिया ( १९) , संजय खाडीया (२0) व विनोद कुल्लू (२0) अशी संशयितांची नावे आहेत. खून प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल या पोलीस पथकांचे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सन्मान केला आहे.

मडगाव - प्रेमात अडसरा येत असल्याने मूळ झारखंड येथील एका तीसवर्षीय इसमाचा निर्घृण्ण खून करुन त्याचा मृतदेह गोव्यातील धारगळ येथील रेल्वे रुळावर टाकून देणाऱ्या पाचजणांना कोकण रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. जैयलेश्वर खाडिया असे मयताचे नाव असून, सर्व संशयितही झारखंड राज्यातील आहेत. विक्रम उर्फ ताबडे खाडिया (२0) , सतीश खाडिया (१९), विपिन खाडिया ( १९) , संजय खाडीया (२0) व विनोद कुल्लू (२0) अशी संशयितांची नावे आहेत. ते मूळ झारखंड राज्यातील गुमला जिल्हयातील रहिवाशी आहे. 

२१ जानेवारी रोजी गोव्यातील धारगळ येथेच खुनाची ही घटना घडली होती. संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या ३०२, २०१, ३४१ कलमांखाली कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी त्यांना पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. मृत जैयलेश्वर हा पेडणे तालुक्यातील धारगळ येथे एका इसमाकडे कामाला होता. हुर्राक गाळण्याचे तो काम करीत होता. 

सदया हुर्राक हंगामा जवळ आल्याने दोन महिन्यापुर्वीच तो गोव्यात आला होता. तो एका महिलेसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. या महिलेला एक पंधरा वर्षीय मुलगी असून, तिच्या पहिल्या पतीपासून तीला ही मुलगी झाली होती. ती मुलगी झारखंड येथे रहात असून, तेथेच तिचे विक्रम खाडिया याच्याकडे सूत जमले होते. दोघांमध्ये प्रेम होते. मात्र, जैयलेश्वर याचा या प्रेमाला विरोध होता. विक्रम हा याच आठवडयात गोव्यात आला होता. आपल्या अन्य मित्रांबरोबर त्याने जैयलेश्वर याला राजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकून घेत नव्हता, त्याचा या प्रेमप्रकरणाला कडाडून विरोध होता. मंगळवारी २१ रोजी रात्री संशयित व मयत जैयलेश्वर हे एका स्थानिक बारमध्ये दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी संशयितांनी जैयलेश्वर याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकायला तयार नव्हता. उभयंतांमध्ये यावेळी कडाक्याचे भांडण झाले. नंतर संशयिंत जैयलेश्वर याला धारगळ रेल्वे रुळाजवळ घेउन गेले. तेथे त्याला मारहाण केल्यानंतर तिक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. व नंतर त्याला रेल्वे रुळावर आणून संशयित घरी परतले. या रुळवरुन धावणाºया रेल्वेखाली तो येईल. हा मृत्यू रेल्वे धडकेने झाला असे पोलिसांना वाटेल व आपले कुर्कम कुणालाही कळणार नाही म्हणून संशयिताने हे नाटय रचले होते असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. मात्र संशयितांचा डाव यशस्वी होउ शकला नाही. रात्रीच्या गस्तीवरील रेल्वे गॅगमनला एक अज्ञात इसम रेल्वे रुळावर पडलेला असल्याचे दिसून आल्यानंतर त्याने लागलीच रेल्वे स्टेशन मास्तरला त्याची कल्पना दिली. नंतर १0८ अ‍ॅम्बुलन्स सेवेच्या मदतीने जैयलेश्वरला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवचिकित्सा अहवालात हा मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाल्यानंतर हा खुनाचाच प्रकार असल्याची पोलिसांना पक्की खात्री झाली होती.

 

कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपअधिक्षक सेमी तावारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेरिफ जॅकीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई , पोलीस शिपाई निलेश सावंत, अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेडडी, तेजस धुरी, प्रदीप गावकर, तानाजी राणे, विराज मलिक, प्रवीण राणे, समीर शेख या कोकण रेल्वे पोलीस ठाण्यावरी पोलिसांसह कुंकळळी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाईक यांचे एक पथक तयार करुन शोधकार्याला सुरुवात केली. नंतर सर्व संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी आपल्या गुन्हयाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल या पोलीस पथकांचे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सन्मान केला आहे.

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसgoaगोवाArrestअटकJharkhandझारखंड