तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली. ...
जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ...
तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले. ...
१९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या. ...
यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. ...
विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही. ...
मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले. ...
फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. ...