आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईहून चाकरमान्यांना गावी आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. वाशी मार्केट येथून गावातील मित्राला सिंधुदुर्गात आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांवर गुन्हे दाखल करीत ट्रक व दुचाकीही ...
सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले. ...
लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस ...
कोरोना व्हायरसचा संपूर्ण नाश व्हावा तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भिरवंडेवासीय व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य उत्तम राहावे . यासाठी भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात असंख्य दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीप तेजातून कोरोना व्हायरसपासून रक ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण ... ...
आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक ...