पैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याने माहूरला पाणीपुरवठा करणारी नळयोजना बंद पडल्याने गेल्या २० दिवसांपासून शहरात निर्जळी असून नगरपंचायतने ११ लाख रुपये भरुन उच्चपातळी बंधाऱ्यातून सोडवून घेतलेले पाणी नदीपात्रातच जिरले. ...
शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभि ...
जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. ...
आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत ...
तळोजामधील कासाडी नदीमध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. कासाडी संवर्धनासाठी ठोस उपाययोजनाच केल्या जात नसून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. ...
कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ...