कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, ...
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृत ...
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक नौकांची धुळधान उडाली. यामध्ये दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी मिळालेल्या नौकांवरील खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी ...
जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत. ...
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर ...
चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ...
कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ...