या कालव्यामधून ११०० क्युसेकने पाणी इंदापूरपर्यंत जात असून, पिकांचे सिंचन तसेच पुण्यासह दौंड, इंदापूर, बारामती हवेली आणि आसपासच्या भागांना पिण्यासाठी सोडण्यात येते ...
गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या २१ गावांतील जमिनी गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेला पाच महिने उलटूनही हतबल झालेल्या ९८ शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...
मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेल्या सुमारे ७ हजार हेक्टरवरील गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा 'यलो अलर्ट' सह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. ...