एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...
राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती. ...
शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्य ...