Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी पुढे गेल्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आहेत. आम्ही कायम त्यांच्या पाठिशी आहोत, असे राऊत कुटुंबियांनी स्पष्ट केले. ...
Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, हे सर्वश्रुत असले तरी, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. जाणून घ्या... ...