देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने ...
समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात अडचणी येत असून, त्या दूर करण्यात राहुल गांधी यांना बराच वेळ लागत असल्याचे आढळून आल्यानंतर आघाडी करण्याची सूत्रे सोनिया गांधी या स्वत:कडे घेतील, अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील घटना चिंताजनक आहे. ...
दूध आंदोलनास पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. बुधवारी शिराळा तालुक्यात खा. शेट्टी यांनी दौरा केला ...
विश्लेषण : विद्यमान सरकारबद्दल महाराष्ट्रात सध्या प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा कोण कसा उठवतो, हे महत्त्वाचे! समोर जात दांडगे आणि धनदांडगे उभे असताना वंचितांचे नेमके काय होईल, हाही मोठा प्रश्न; पण वंचितांचा आवाज सतत दाबत राहण्यापेक्षा त्यांचाही कुण ...