देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची सोमवारी बैठक घेतली, यात १०६ आमदार असल्याचा दावा केला, त्यानंतर या सर्व आमदारांना जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं. ...
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेल्या सचिन पायलटांची मनधरणी अद्यापही सुरूच आहे. आता सचिन पायलट यांनी काँग्रेस हाय कमांडसमोर तीन मागण्या ठेवल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यांपैकी दोन मागण्यांवर काँग्रेस राजी होतानाही दिसता आहे. ...