देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...
गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. ...
आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. ...