पंजाब किंग्सच्या संघाला धर्मशाला येथील येथील घरच्या मैदानात यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजीसह खराब क्षेत्ररक्षणाचा पुन्हा एकदा पंजाबच्या संघाला फटका बसला. या पराभवासह आता पहिल्या सात सामन्यात अपराजित राहिलेला संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत मागे पडला आहे. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ३० धावा अधिक काढूनही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे कमी पडल्याचे स्पष्ट सांगितले. यावेळी त्याने युझवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही? याचंही उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर श्रेयस अय्यर नाराज
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या पराभवाला गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले. सामन्यानंतर ब्रॉडकास्टर्सशी बोलताना तो म्हणाला, "मी गोष्ट फिरवून सांगणार नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. या खेळपट्टीवर आम्ही किमान ३० धावा जास्त केल्या होत्या. चेंडू सीम होत होता तसेच उसळीही घेत होता"
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
युजवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही?
या सामन्यात युजवेंद्र चहल याला श्रेयस अय्यरने एकही षटक दिले नाही. याबाबत विचारले असता अय्यर म्हणाला, "माझ्या मनात तो विचार नक्कीच होता. पण खेळपट्टीवर सीमर्सला मदत मिळत होती. जर आमच्या गोलंदाजांनी योग्य लाइन-लेंथसह गोलंदाजी केली असती, तर विकेट्स मिळू शकल्या असत्या. दुर्दैवाने आम्हाला ते जमलं नाही."
गुणतालिकेत पंजाब चौथ्या स्थानी
पंजाब किंग्सचा संघाने पहिल्या सात सामन्यात सहा विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह यंदाच्या मोहिमेत अगदी दिमाखदार सुरुवात केली. पण आता सलग चौथ्या पराभवामुळे प्लेऑफ्सच्या शर्यतीत ते चौथ्या स्थानावर आहेत. मागील चारही सामन्यात क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे. ११ सामन्यानंतर त्यांच्या खात्यात १३ गुण जमा असून आघाडीच्या चारमधील स्थान कामय ठेवण्यासाठी पंजाबच्या संघाला ३ पैकी किमान दोन सामने जिंकावे लागतील.