शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

‘लोकमत’चा दणका; अखेर ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना शाळेचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:55 AM

निम्मी फी स्वीकारून दिले दाखले; दहावीची परीक्षा देणे शक्य

अंबरनाथ : अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत फी भरण्याच्या वादात शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये समेट होत नसल्याने तीन विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच काँग्रेस आणि मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनासोबत चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. दोन तास चाललेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले देण्यावर सहमती झाली. पालकांनी निम्मी फी भरल्यावर दाखले देण्याबाबत शाळेनी सकारात्कमता दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांचे १०वीचे वर्ष वाचवण्यात यश आले आहे.

अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरु होते. पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज भरल्याने त्यांना फी माफी हवी होती तर आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने फेटाळल्याने पालकांनी त्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यासाठी नोटीस बजावली होती.

त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यात वाद सुरु होता. या वादावर तोडगा निघत नसल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर होते. दहावीसाठी बाहेरुन अर्ज (१७ नंबर फॉर्म) भरण्याची मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सायंकाळी चारच्या आत शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते.

शाळा प्रशासन फी भरण्याच्या मुद्यावर ठाम असल्याने त्यावर तोडगा निघत नव्हता. अखेर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते आनिल कांबळे, महेश चिकणे, तुषार गांगुर्डे यांच्या पुढाकाराने मार्ग काढण्यात आला. शाळा प्रशासनासोबत चर्चा केल्यावर शाळेने पालकांना निम्मी फी भरुन शाळेचे दाखले देण्यावर सहमती दर्शवली. यावर पालकांनीही सकारात्मक भूमिका घेत शक्य तेवढी फी भरुन शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केले. अ

खेर दुपारी तीन वाजता या तिन्ही विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांच्या हातात मिळाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने त्यांनी आता बाहेरुन दहावीची परीक्षा देण्यासाठी बोर्डाकडे अर्ज केला.शाळा प्रशासनाला सुरुवातीपासुनच आम्ही तडजोडीच्या मार्गाने प्रकरण सोडवण्याची विनंती केली होती. शाळेने वेळेवर निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यात यश आले आहे. इतर पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या तडजोडीच्या मार्गाने सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.- प्रदीप पाटील, अध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस

पालक आणि शाळा यांच्यात अनेक वर्षांपासून हा वाद आहे. तो वाद या तीन विद्यार्थ्यांच्या निमित्ताने सोडवण्यात यश आले आहे. आता इतर ज्या ११ ते १२ विद्यार्थ्यांच्या समस्या राहिल्या आहेत त्यावरही यशस्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. शाळा प्रशासन आणि पालकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हे शक्य झाले आहे.- कुणाल भोईर, शहराध्यक्ष, अंबरनाथ मनसे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी