हिंजवडी : शाळा सुटल्यावर आनंदात घरी जात असताना अवघ्या दोन पावलांवर घर; मात्र घरात जाण्याआधी काळाने घाला घातला. शिवाजी चौकातून वाकडच्या दिशेने भरघाव वेगात जाणाऱ्या खासगी बसने तीनही भावंडांना चिरडले आणि प्रसाद कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं.
सूरज देवा प्रसाद (वय ६), अर्चना देवा प्रसाद (११) आणि प्रिया देवा प्रसाद (१६) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. दरम्यान, मूळचे उत्तर प्रदेशातील कुटुंब काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त हिंजवडीत पंचरत्न चौकातील वाघिरे चाळीत भाड्याच्या खोलीत स्थायिक झाले होते. लाँड्री व्यवसाय असल्याने परिसरातील अनेकांशी प्रसाद कुटुंबाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध तयार झाले होते. मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र, सोमवारी (दि. १) सायंकाळी क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
चार बहिणी अन् एकुलता एक सूरज
चार बहिणींनंतर सूरजचा जन्म झाल्याने प्रसाद कुटुंबाचा तो लाडका होता. सूरजला नुकतेच हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल केले होते. रोज, शाळेतील नवनवीन गमती-जमती आई-वडिलांना सांगत त्याचा शालेय प्रवास सुरू झाला होता. घटनेच्या दिवशीसुद्धा अगदी हसत-खेळत पाठीवर शाळेची बॅग घेऊन आपल्या बहिणींबरोबर आनंदात घराच्या ओढीने निघालेल्या सूरजवर काळाने झडप घातली. घर आणि वडिलांचे दुकान समोर दिसत असताना घरात पोहोचण्याआधीच तिन्ही भावंडांवर काळाने झडप घातली.
Web Summary : Three siblings died in Hinjawadi after being hit by a bus near their home. Suraj, Archana, and Priya Prasad were returning from school when the accident occurred. The family, originally from Uttar Pradesh, lived in a rented room and ran a laundry business. The tragic incident has devastated the community.
Web Summary : हिंजवडी में घर के पास बस की चपेट में आने से तीन बच्चों की मौत हो गई। सूरज, अर्चना और प्रिया प्रसाद स्कूल से लौट रहे थे, तभी यह दुर्घटना हुई। उत्तर प्रदेश के मूल निवासी यह परिवार किराए के कमरे में रहता था और लॉन्ड्री का व्यवसाय चलाता था। इस दुखद घटना से समुदाय में शोक की लहर है।