शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 8:53 PM

बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.

पुणे : बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.  १८ व १९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या असून ते पुढील २४ तासात पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात पडलेला पाऊस वैभववाडी, विक्रमगड १३०, सुधागड पाली ११०, माथेरान १००, भिवंडी, कल्याण ९०, ठाणे ८०, खालापूर, पनवेल ७, अंबरनाथ, उल्हासनगर ६०, पोलादपूर ५०, कणकवली ४० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, ओझरखेडा ६०, लोणावळा, महाबळेश्वर ५०, शहादा ३० मिमी पावसाची नोंद झाली़ मराठवाड्यातील अर्धापूर, घनसावगी, हिमायतनगर, परभणी, शिरपूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात कोरची ५०, चिखलदरा, देवरी, सेलू ३०, आर्वी, कुरखेडा, मौदा, पारशिवनी २० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावर ताम्हिणी, लोणावळा ६०, डुंगरवाडी, कोयना (नवजा) ५० मिमी पाऊस झाला होता़.  

इशारा :

  •  १८ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
  • १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २१ सप्टेंब रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
  • १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
  • पालघर, रायगड, जिल्ह्यात मुसळधार तर, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्'ात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. 
  • १९ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
  • रायगड, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, अहमदनगर, सातारा, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ . 
  • २० सप्टेंबरला पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. 
टॅग्स :weatherहवामानRainपाऊस