Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:11 IST2026-05-18T13:05:14+5:302026-05-18T13:11:00+5:30

Top 5 Safest Cars in India: इंडिया एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये भारतातील टॉप ५ सुरक्षित कारची यादी समोर आली.

किया सेल्टोस: नवीन पिढीची किया सेल्टोस ही सध्या भारतातील सर्वात सुरक्षित पेट्रोल-डिझेल कार आहे. इंडिया एनसीएपी चाचणीमध्ये या गाडीने ८१ पैकी ७६.७० गुणांचा प्रभावी स्कोअर मिळवला आहे. या मिड-साईज एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि लेव्हल-२ ADAS सारखी उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून मिळतात, जी तिला अपघातांपासून वाचवण्यास मदत करतात.

महिंद्रा थार रॉक्स: महिंद्राचे हे शक्तिशाली वाहन भारतातील सर्वात सुरक्षित लॅडर-फ्रेम एसयूव्ही बनले आहे. क्रॅश चाचण्यांदरम्यान तिची बॉडी शेल पूर्णपणे स्थिर राहिली आणि तिला पूर्ण ५-स्टार रेटिंग मिळाले. सुरक्षिततेच्या बाबतीत, या गाडीने ८१ पैकी ७६.०९ गुण मिळवले आहेत. यामध्ये लेव्हल-२ ADAS सोबत ३५ हून अधिक सुरक्षित फिचर्स मिळतात.

टाटा सिएरा: टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या टिकाऊपणासाठी ओळखली जाते. टाटा सिएरा हा वारसा पुढे चालवते. या एसयूव्हीने क्रॅश टेस्टमध्ये ८१ पैकी ७५.८७ गुणांचा उत्तम स्कोअर मिळवला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात २१-फंक्शन ईएसपी, रोलओव्हर मिटिगेशन आणि प्रगत लेव्हल २+ एडीएस यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

ह्युंदाई व्हेन्यू: ह्युंदाई व्हेन्यू आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. इंडिया एनसीएपीमध्ये या गाडीने ७५.६१ गुण मिळवले आहेत. नवीन मॉडेलमध्ये ७१ टक्के स्टीलचा वापर केला आहे, ज्यामुळे तिची रचना अत्यंत मजबूत झाली. सुरक्षेसाठी, यात फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट आणि सहा एअरबॅग्ज यांसारखी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत.

टाटा पंच: टाटाची सर्वात लहान एसयूव्ही, पंच, देखील सुरक्षेच्या बाबतीत कमी प्रभावी नाही. या गाडीने चाचणीत ८१ पैकी ७५.५८ गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या मायक्रो-एसयूव्हीमध्ये ग्राहकांना टॉप व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग्ज, टीपीएमएस आणि ३६०-डिग्री कॅमेरा मिळतो.