शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani : अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 16:47 IST

Smriti Irani And Lok Sabha Election 2024 : अमेठीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत. याच दरम्यान, अमेठीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही या भागातील काँग्रेसचे राजकारण पाहिलं आहे. तुम्ही सर्वांनी गंभीर परिस्थितीत काँग्रेस गायब होताना पाहिली आहे. कोरोना व्हायरस आला तेव्हा काँग्रेस पक्षातील कोणीही लोकांमध्ये दिसलं नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. 

अमेठीतील काँग्रेस उमेदवाराच्या घोषणेला होत असलेल्या विलंबाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "यावरून आता काँग्रेस पक्षालाही कळलं आहे की अमेठीने पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण म्हणजे जर आपण काँग्रेस पक्षाची 50 वर्षे आणि राहुल गांधींची 15 वर्षे विरुद्ध भाजपा खासदाराची पाच वर्षे पाहा म्हणजे जमीन आसमानाचा फरक दिसेल."

"जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही. तुमची खासदार गावोगावी गेली हे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. कोरोनाच्या काळात मी गावोगावी फिरत होते. मी येथे जातीच्या आधारावर नाही तर अमेठीची एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुमचं समर्थन मागत आहे." 

"अमेठीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 6 हजार रुपये मागितले नाहीत, मात्र पंतप्रधान मोदींनी ही रक्कम वाढवली. आज अमेठी लोकसभा मतदारसंघात 4 लाख 20 हजार कुटुंबांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. काँग्रेसची 50 वर्षे हुकुमशाही होती. अमेठीत वर्षभरात ते गरिबांसाठी शौचालयही बांधू शकले नाहीत. त्यांना (राहुल गांधी) शिंका आली तरी ते परदेशातील रुग्णालयात जायचे पण अमेठीत मेडिकल कॉलेजही बांधलं नाही" असं देखील स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा