शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

Smriti Irani : अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:32 PM

Smriti Irani And Lok Sabha Election 2024 : अमेठीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत. याच दरम्यान, अमेठीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही या भागातील काँग्रेसचे राजकारण पाहिलं आहे. तुम्ही सर्वांनी गंभीर परिस्थितीत काँग्रेस गायब होताना पाहिली आहे. कोरोना व्हायरस आला तेव्हा काँग्रेस पक्षातील कोणीही लोकांमध्ये दिसलं नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. 

अमेठीतील काँग्रेस उमेदवाराच्या घोषणेला होत असलेल्या विलंबाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "यावरून आता काँग्रेस पक्षालाही कळलं आहे की अमेठीने पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण म्हणजे जर आपण काँग्रेस पक्षाची 50 वर्षे आणि राहुल गांधींची 15 वर्षे विरुद्ध भाजपा खासदाराची पाच वर्षे पाहा म्हणजे जमीन आसमानाचा फरक दिसेल."

"जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही. तुमची खासदार गावोगावी गेली हे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. कोरोनाच्या काळात मी गावोगावी फिरत होते. मी येथे जातीच्या आधारावर नाही तर अमेठीची एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुमचं समर्थन मागत आहे." 

"अमेठीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 6 हजार रुपये मागितले नाहीत, मात्र पंतप्रधान मोदींनी ही रक्कम वाढवली. आज अमेठी लोकसभा मतदारसंघात 4 लाख 20 हजार कुटुंबांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. काँग्रेसची 50 वर्षे हुकुमशाही होती. अमेठीत वर्षभरात ते गरिबांसाठी शौचालयही बांधू शकले नाहीत. त्यांना (राहुल गांधी) शिंका आली तरी ते परदेशातील रुग्णालयात जायचे पण अमेठीत मेडिकल कॉलेजही बांधलं नाही" असं देखील स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा