शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani : "राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 14:02 IST

Lok Sabha Elections 2024 Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी यांनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे अपमान केला आहे. राहुल गांधींना इन्हौना आणि पन्हौना यातील फरक माहीत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"भाजपा सरकारच्या काळात अमेठीचा विकास झपाट्याने झाला. भाजपा सरकारने अमेठीतील जनतेला मेडिकल कॉलेज दिलं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपाने अमेठीला सैनिक स्कूल देण्याचे काम हाती घेतले. राहुल गांधी खासदार असताना 15 वर्षांपैकी 10 वर्षे काँग्रेसचं सरकार होतं. असं असतानाही अमेठी विकासापासून कोसो दूर राहिलं."

"भाजपा सरकारच्या काळात नदीवर पूलही बांधला गेला आणि अयोध्या राष्ट्रीय महामार्गही बांधला गेला. कोरोना काळापासून आतापर्यंत भाजपाचे काम सर्वांनी पाहिले आहे. भाजपाच्या मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांना किसान सन्मान, मोफत रेशन, घरं आणि शौचालय मिळालं आहे. काँग्रेस सरकारमध्ये दलाल जनतेचा पैसा खात असत. विरोधी पक्षातील लोकही माझ्या घरी येऊन विकासाची मागणी करतात" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. 

आमदार सुरेश पासी म्हणाले की, "भाजपाच्या कार्यकाळात मुलींच्या शिक्षणासाठी कथौरा ग्रामसभेतच महिला डिग्री कॉलेज बांधले आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सद्भावना मंडप बांधण्यात येत आहे. तरुणांना तंत्रशिक्षण देण्यासाठी आयटीआय उभारले जात आहे. जिथे युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळू शकेल." 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा