शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 9:07 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली -  देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. 1 जूनपासून दररोज 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. तसेच  मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान अनेक मजुरांचा हा वेगवेगळ्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र रेल्वे प्रवासातही मजुरांचा मृत्यू होत आहे. प्रवासादरम्यान अन्नपाण्यावाचून आणि उष्णतेमुळे मजुरांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या तब्बल सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. कोरोनाशी सामना करण्यापूर्वीच अन्नपाण्याची कमतरता आणि वाढता उन्हाळा यामुळे मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सोमवारी 'या' प्रवासी मजुरांचा झाला मृत्यू

- पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी इरशाद यांचा मुजफ्फरपूर जंक्शन येथे मृत्यू.

- 55 वर्षीय अनवर यांचा बैरोनी येथे मृत्यू झाला. मुंबईतून सुरू केला होता प्रवास

- सूरतहून येणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा सासाराम स्टेशनवर मृत्यू

- महाराष्ट्रातून येणाऱ्या मोतिहारीच्या मजुराचा जहानाबादमध्ये मृत्यू

- मुंबईहून सीतामढीला निघालेल्या कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाचा कानपूरमध्ये मृत्यू

- अहमदाबादहून कटिहारला जाणाऱ्या अलवीनाचा रेल्वे प्रवासात मृत्यू

प्रवासी मजुरांच्या मृत्यूवर रेल्वे अधिकारी म्हणतात...

रेल्वेला होणारा विलंब आणि रेल्वेतील अन्नपाणी सुविधेबाबत पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही मजुराचा भूकेमुळे मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातील काही मजुरांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांना सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत रेल्वेतर्फे वेळेवर जेवण दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

निरनिराळ्या स्टेशनांवर यासाठी फूड सेंटर उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर येते, तेव्हा रेल्वेतील सर्वांना अन्न-पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक रेल्वे या बऱ्यापैकी वेळेवर धावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतीही रेल्वे ही पाच किंवा सात दिवसांच्या उशिराने धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेDeathमृत्यूIndiaभारतhospitalहॉस्पिटल