शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

८ वी ते १२ वीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करा; ‘एनसीईआरटी’ची सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:28 PM

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते.

नवी दिल्ली : कोरोना महामारीची परिस्थिती आटोक्यात आली व संपूर्ण देशातील ‘लॉकडाऊन’ उठविणे शक्य झाले, तर ८ वी ते १२ वीपर्यंतच्या इयत्तांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू करावेत, अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी)ने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते. सूत्रांनुसार परिषदेने आपल्या शिफारशींचा कच्चा मसुदा मंत्रालयास सादर केला आहे. अजून नक्की काही ठरलेले नाही व केंद्रीय गृहमंत्रालय ‘लॉकडाऊन’ व निर्बंधांसंबंधी काय निर्णय घेते, यावर शाळा पुन्हा सुरू होणे मुख्यत: अवलंबून असेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

परिषद म्हणते की, परिस्थिती पूर्ण सुरक्षित होईपर्यंत प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्तांचे (पहिली ते सातवी) वर्ग मात्र सुरू केले जाऊ नयेत. नव्या बदललेल्या परिस्थितीत वर्ग कसे घ्यावेत व ते घेताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देऊन तयारी करून घेण्यासाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याआधी शिक्षकांसाठी एखादा अल्पावधीचा आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावा, असेही परिषदेने म्हटले आहे.

‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन

33% विद्यार्थ्यांनाच हजर राहू द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. परिस्थिती अनुकूल असेल, तर ‘ग्रीन’ व ‘आॅरेंज झोन’मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्तांचे शालेय वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू केले जाऊ शकतील. शिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी