अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत केंद्र शासनाने दुरुस्ती विधेयक मांडून ते तत्काळ संमत करावे व हा कायदा कठोर करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केली. ...
मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली ...
एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज ...
लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात आठ समित्यांच्या माध्यमातून वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भ ...
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला. ...
सिन्नर तालुक्यातील गुळवंच, बारागावपिंप्रीसह सहा गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेत गुळवंच, निमगाव, हिवरगाव, केपावाडी, पाटपिंप्री व सुळेवाडी या गावांचा समावेश असून, ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्राम ...
त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत. ...
येथील मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक रस्ता दिवसेंदिवस अतिशय गंभीर व धोकादायक बनत चालला असून, वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. यातील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटरपैकी सहाशे मीटर (अर्धा किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनच ...
लभान तांडा वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने मागील महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, क ...