शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:23 IST

Sanjay Raut News: महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना असल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा दोन्ही पक्षातील नेते. पदाधिकारी आणि कार्यकर्ते वारंवार व्यक्त करत असतात. दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता राजकारणामुळे दुरावलेले हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना असल्याचं सांगितलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हातात घ्यावीत, आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या. ही आतापर्यंतची लोकभावना होती आणि आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तीच भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली आहे. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून येत असलेल्या प्रतिक्रियांवरूनही संजय राऊत यांनी टीका केली, ते म्हणाले की, आता काही लोकांना त्याविषयी वेदना होणार. कारण उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले, त्यांनी एकत्र राजकारण केलं, तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल. आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, असं काही जणांना वाटतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आहे. तसेच आजही करतंय. पिढ्या बदलल्या, पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे काही जणांना भीती वाटत आहे. त्यातून त्यांच्या पोटामधून काही मळमळ बाहेर येत आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय, तसेच या घडामोडींकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, या विषयावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आमच्याकडून कुठलाही नेता काहीही बोललेला नाही. आम्ही ठरवलं आहे की, कुणीही काहीही बोलून द्या आपण भूतकाळात डोकावून पाहायचं नाही. हा आमचा फॉर्म्युला आहे. एक पाऊल पुढे टाकायचं, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. हे पाऊन पुढे टाकताना मागे काय झालं त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. मागे काय बोललो, काय टीका केली, हे विसरायला पाहिजे. यलाच सकारात्मक दृष्टीकोन म्हणतात, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच याबाबत सकारात्मकता ठेवा, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे