PM Kisan Scheme : दोन लाख अपात्र शेतकऱ्यांकडून १९३ कोटी रुपये वसूल करणार, राज्यातील २८ जिल्ह्यांतील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 01:15 AM2020-11-05T01:15:49+5:302020-11-05T06:46:29+5:30

PM Kisan Scheme: राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत.

PM Kisan Scheme: Rs 193 crore will be recovered from two lakh ineligible farmers, situation in 28 districts of the state | PM Kisan Scheme : दोन लाख अपात्र शेतकऱ्यांकडून १९३ कोटी रुपये वसूल करणार, राज्यातील २८ जिल्ह्यांतील स्थिती 

PM Kisan Scheme : दोन लाख अपात्र शेतकऱ्यांकडून १९३ कोटी रुपये वसूल करणार, राज्यातील २८ जिल्ह्यांतील स्थिती 

Next

मुंबई : केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत राज्यातील २८ जिल्ह्यांत २ लाख ५१ हजार ९८२ शेतकरी ‘लोकमत’ने राज्यभर 
केलेल्या पाहणीत अपात्र आढळले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली असून त्यांच्याकडून तब्बल १९३ कोटी 
६६ लाख रूपये वसूल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नावावर 
जमीन नसलेल्यांपासून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही 
या योजनेचा लाभ घेतल्याचे ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये आढळले आहे. 
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत. विदर्भात ५२ हजार, पश्चिम महाराष्ट्रात ७९ हजार तर उत्तर महाराष्ट्रात ३९ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. 

काय आहेत योजनेचे निकष?
दोन हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. राज्यात डिसेंबर २०१८ फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. दर चार महिन्याला हे पैसे खात्यात जमा होतात. 

वसुलीबरोबर 
फौजदारी गुन्हाही 
अर्जात चुकीची माहिती दिली असल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहीन, असे संबंधित शेतकऱ्याकडून लिहून घेतलेले आहे. त्यामुळे रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. 


महा-ई सेवा 
केंद्रांवर कारवाई
योजनेसाठी काम करणाऱ्या 
व माहिती घेण्यात हलगर्जी करणाऱ्या महा- ई सेवा केंद्रांवर कारवाई सुरू झाली आहे. 

कोण आहेत बोगस लाभार्थी?
n नावावर जमीन नसलेल्यांपासून गलेलठ्ठ पगार घेणारे सरकारी अधिकारी बोगस लाभार्थी आढळले आहेत. दहा हजार रुपयांच्यावर निवृत्ती वेतन घेणारेही बोगस लाभार्थी आहेत. 
n काहींकडे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे, मात्र तेही लाभार्थी आढळले आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्याने गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. 

विदर्भ
जिल्हा        बोगस      रक्कम 
    लाभार्थी    वसूल करणार
अकोला          ७,१०४     ४­.८९ कोटी 
भंडारा           ३,२१३    २.६६ कोटी 
चंद्रपूर           ३,४६५    ३.४४ कोटी 
गडचिरोली      ९१०          ८३.३४ लाख   
यवतमाळ       १५,०००    ३ कोटी 
गोंदिया           ३,१७१    ३.५७ कोटी 
वाशिम           १,७२९    १.५४ कोटी 
वर्धा    ४,३६६    ३.७८ कोटी 
बुलडाणा    ५,९८६    ५.३३ कोटी 
अमरावती        ७,६०३    ५.८८ कोटी 

प. महाराष्ट्र
जिल्हा        बोगस      रक्कम 
    लाभार्थी    वसूल करणार
पुणे    १६,११८    १४.०७  कोटी 
कोल्हापूर    १३,४३७    १३.२६  कोटी 
सांगली        १४, २६७    ११.३५  कोटी 
सातारा        १९,०६६    ११.४३  कोटी 
सोलापूर      १६,२१०    १५.१६  कोटी 

उत्तर महाराष्ट्र
जिल्हा        बोगस      रक्कम 
    लाभार्थी    वसूल करणार
नाशिक        ११,८५४    ११.१० काेटी
नगर    २७,९६३      २२ कोटी
धुळे            ७,७२७       ७ काेटी
जळगाव       १३,१७२      १२.४८ काेटी
नंदुरबार       १,७४६        १.७१ काेटी

मराठवाडा
जिल्हा        बोगस      रक्कम 
    लाभार्थी    वसूल करणार
औरंगाबाद    ७,५१६    ७.९ कोटी 
नांदेड    ९,९८५    ७.४३ कोटी 
बीड    ३१,६६९    १४.२७ कोटी 
लातूर    ८,५५१    ८ कोटी
परभणी    ४,६७७    ४.२४ कोटी 
जालना    ५१२२    ४.७५  कोटी 
उस्मानाबाद    अपात्र नाही    -

कोकण
जिल्हा        बोगस      रक्कम 
    लाभार्थी    वसूल करणार
रत्नागिरी      ५,६००      २.११ काेटी

Web Title: PM Kisan Scheme: Rs 193 crore will be recovered from two lakh ineligible farmers, situation in 28 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.