शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात अस्मानी संकट, अनेक ठिकाणी पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:41 IST

चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे आला पूर. व्यापारी, शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान.

ठळक मुद्देचिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे आला पूर.व्यापारी, शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान.

रत्नागिरी - गेले दहा दिवस संततधार सुरू असलेल्या आणि बुधवारी रात्री मुसळधार कोसळलेल्या पावसाने २००५ च्या अस्मानी संकटाची आठवण करुन दिली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे पूर आला आहे. चिपळूण तालुक्यात पेढे येथे दरड कोसळून तीनजण त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

येथे कोसळत पावसामुळे अवघा परिसर जलमय झाला असून २००५ मधील महापुराची पुनरावृत्ती झाल्याप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून अनेकांना पुरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली आहे. या पावसात तालुक्यातील पेढे-कुंभारवाडी येथे दरड कोसळून तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने कोसळणाऱ्या  पावसामुळे राजापूर शहराला सलग १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातुन वाहणाऱ्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतची अनेक गावे व वाड्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . अर्जुना नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून रायपाटण गांगणवाडीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाटे येथील ठाकरेवाडीचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. प्रिंदावण तारळ भागातून वाहणाऱ्या सुक नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन मळेशेती गेले १४ दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

गेले दोन आठवडे संततधारेने लागणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला गेले १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे . सातत्याने पुराच्या पाण्यात चढ उतार राहिल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ सातत्याने पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे गेले पंधरा दिवस बाजारपेठ बंदच आहे. गेले चार महिने कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने बाजारपेठ बंद होती मात्र त्यानंतर आता पावसामुळे सुमारे १५ दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने राजापूर शहरातील व्यापारी मेटाकुटीला आले आहेत.

संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी मुळे बावनदीला पुर मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन बावनदी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक थांबवण्यात येणार आहे. तालुक्यातील निवधे पूल फूट ब्रीज वाहून गेला. तसंच निवधे गावाचा संपर्क तुटला.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस