शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 11:57 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला.

ठळक मुद्देगृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनी दिली होती.त्यांच्यावरील कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातच नव्हे, तर देशभरात लॉकडाऊन सुरू असताना, येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबाचे 23 सदस्य महाबळेश्वरला पोहोचल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. त्यांना ही परवानगी कुणी दिली, का दिली, कशी काय दिली, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आणि राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात आलं. चौकशीअंती, गृह विभागाचे प्रधान सचिव, आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी ही परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं. त्यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असलं, तरी या कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही फोनवरून चर्चा केल्याचंही समजतं. 

वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई

‘पेज थ्री’ इमेज असणारे अधिकारी म्हणून अमिताभ गुप्ता यांच्याविषयी चर्चा होत असते. दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना, लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनीच दिल्याचं कळताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदवली होती. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होतं. पण, त्याला उशीर केला गेला. स्वाभाविकच, सरकारच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्विग्न झाल्याचं कळतं. 

राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना आहेत, याची पूर्ण कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. देश भयंकर संकटात असताना एखादा अधिकारी आपले ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत चुकीची सवलत देत असेल तर तो अक्षम्य गुन्हा ठरू शकतो. एवढ्या एका कारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करू शकतात. मात्र, अधिकारी आणि नेते यांच्या संगनमताची अनेक उदाहरणं आहेत. तशा संगनमतातूनच तर हा प्रकार झाला नाही ना, अशीही कुजबूज ऐकू येतेय.

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं पंतप्रधानांपासून सगळेच नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला वारंवार हे आवाहन केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. वाधवान बंधू आपल्या 5 आलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन महाबळेश्वरला पोहोचले. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी महाबळेश्वरला पोहोचता येईल, यासाठी सहकार्य करावं असं गृहखात्यानं दिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.  

Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला 

उद्धव ठाकरे निलंबनाची कारवाई करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करू शकतात. तो अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. एखाद्या अधिकाऱ्यांला निलंबित केल्यानंतर कारणांसहित याची माहिती मुख्यमंत्री केंद्र सरकारला देतात. केंद्राकडून ती माहिती युपीएससीकडे पाठवली जाते.  त्यामुळे आता, वाधवान कुटुंबीयांना स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करून केंद्राला तसे कळवावे असा दबाव उद्धव ठाकरेंवर वाढतोय. ते आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस